१०वी व १२वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ; अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा प्रेरणादायी उपक्रम !

१०वी व १२वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ; अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा प्रेरणादायी उपक्रम !

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी- चैतन्य महाले) : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्यावतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. २०२५ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या मेहनतीला मान्यता देणे, त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणे. शिक्षणातील यशाची दखल समाजाने घेतली पाहिजे, हा सकारात्मक संदेश या सत्कार समारंभातून दिला गेला.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा प्रकारचे गौरव समारंभ ही एक मानसिक उर्जा निर्माण करणारी गोष्ट आहे. समाजात शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणारा आणि नव्या पिढीला योग्य दिशा देणारा हा उपक्रम उपस्थित सर्वांनी गौरवाने अनुभवला. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा हा सन्मान सोहळा प्रेरणादायी, प्रशंसनीय आणि सामाजिकदृष्ट्या परिणामकारक ठरला.


administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *